Categories: राजकारण

अरे बाबा; इतक्या दिवस झोपा काढत होता का..? अजितदादांचा सवाल

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर: प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदीवरील असणाऱ्या भोंग्याला विरोध केला. त्याचवेळी आम्हीदेखील मशिदीसमोर डबल लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू,असे म्हटले होते.त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात काही जण अचानक बाहेर पडले आहेत आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करत आहेत. एवढ्या दिवस झोपा काढल्या का ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

कोपरगाव येथे अजित पवार यांच्या हस्ते बसस्थानक, पोलीस ठाणे, पंचायत समितीची इमारत आणि माजी मंत्री शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, मागील सरकारमध्ये भोंग्याविषयी बोलणारे कोणी नव्हते का? मात्र सध्या काही लोक अशाच गोष्टी पुढे आणण्याचे काम करत आहेत. यांच्याकडून विकासाला महत्व दिले जात नाही. त्याऐवजी वेगळी चर्चा करून समाजात वितुष्ट आणि दरी कशी निर्माण होईल, हे पहिले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपण गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा हा विचार आहे. भोंग्यासारख्या गोष्टी बोलुन विकास होत नसतो. मात्र आपण विकासाला महत्व देऊ. आम्ही तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहोत. मात्र जनतेचे भले करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 


ह्याचा प्रसार करा
Reporter AB News

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago