

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला तब्बल अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापपर्यंत राज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती केली नाही. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे १२ आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष वेधत त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली.
राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर अनेकदा राज्यपाल आणि राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यातूनच राज्यातील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपालांनी निर्णय दिलेला नाही. या संदर्भात अनेकदा चर्चा होवूनही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.
लक्षद्विप येथील काही समस्यांबाबत शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, शरद पवार यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांनी अडवून ठेवल्याचे सांगितले. तसेच याबाबत लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी याबाबत काय निर्णय घेतात याकडेच राज्याचं लक्ष लागलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…