

मुंबई : प्रतिनिधी
मशिदींवरील भोंग्यांवरुन राज्यातलं राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात फटकारले आहे. हे राज्य कायद्यावर चालतं, इथे कुणाची हुकुमशाही चालणार नाही. जो काही अल्टीमेटम द्यायचा आहे तो आपल्या घरच्यांना द्या अशा शब्दात अजितदादांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अल्टीमेटमची भाषा कोणीही वापरू नये. ही हुकुमशाही नाही. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे गोष्टी होतील. कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. जर कोणाला अल्टीमेटम द्यायचाच असेल तर तर तो आपल्या घरातल्याना द्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी भोंग्यावरुन सुरु असलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चाललेले राज्य आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. कायद्याचा मान राखूनच सर्व गोष्टी होतील. त्यामुळे तिथे आम्हीही असलो तरी कायदा सर्वांसाठी समान असेल असेही अजित पवार म्हणाले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…