

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अन्य महापुरुषांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्ये केली आहेत. त्यातच आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून वादही पेटला आहे. कर्नाटककडून होणारी मुजोरी आणि मराठी जनतेवर होणारा अन्याय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली.
या चर्चेमध्ये अमित शाह यांनी संबंधित विषयांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी येत्या दोन दिवसांत या विषयांवर मोठा निर्णय घेतला जाईल असेही संकेत मिळत आहेत. सीमाप्रश्न आणि राज्यपाल या दोन्ही विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन सध्याची परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा असेल अशीही माहिती मिळत आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…