

पैठण : प्रतिनिधी
भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची सध्या मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पैठणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळांच्या अनुदानावरून बोलताना हे वादग्रस्त विधान केले आहे. ‘जुन्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्या काळात सरकार अनुदान देत नव्हते. त्यामुळे त्यांनी शाळेसाठी लोकांकडे भीक मागितली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून जोरदार हल्ला चढवला आहे. एकीकडे राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…