

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळतच चालला आहे. याचे पडसाद लोकसभेतही उमटले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाप्रकरणी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील काही दिवसांपासून भाजपशासित राज्याकडून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे.
आजपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर संसदेत प्रश्न उपस्थित केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या दहा दिवसांपासून एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या शेजारील कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या बाबतीत प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्र तोडण्याच्या बाबतीत कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काल तर हद्दच झाली. कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील लोकांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भारत हा एक देश आहेत. त्यामुळे देशात हे चालणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…