

बीड : प्रतिनिधी
प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचे असते याचे उदाहरण आज बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे आणि त्याकरता लागणारे हप्ते मिळावे यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या पारधी समाजातील एका उपोषणकर्त्याचा जीव गेला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब भुजाराव पवार ( वय, ५५ रा. वासनवाडी ता. जि. बीड ) हे त्यांच्या कुटुंबियांसह दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरात उपोषणासाठी बसले होते. हक्काचे घरकुल बांधून मिळावे आणि त्याकरिता लागणारे हप्ते मिळावे या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते. मात्र दुर्दैवाने आज पहाटे थंडीच्या कडाक्यात त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाला वारंवार अर्ज आणि निवेदन देऊनही मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आमच्यावर उपोषणास बसण्याची वेळ आली. थंडीच्या कडाक्यामुळेच आप्पासाहेब पवार यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे आप्पासाहेब पवार यांचा मृत्यू झाल्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…