

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणा दोन बालकाच्या जीवावर बेतला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात टालेवाडी येथे दोन सख्ख्या चुलत बहिण-भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साक्षी भरत बडे (वय १२) आणि सार्थक अशोक बडे (वय ९) असे मृत पावलेल्या बहीण भावाचे नाव आहे.
बडे कुटुंबियांच्या घराशेजारी विद्युत वाहक खांब आहे. त्या खांबातून सातत्याने त्यांच्या घरामध्ये वीज उतरत असे. शनिवारी साक्षी आणि सार्थक दोघे त्यांच्या घराच्या छतावर खेळत होते. त्यावेळी विजेचा धक्का लागून दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. दोन्ही चिमुकल्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बडे कुटुंबीयांनी या संदर्भात अनेकवेळा महावितरणकडे तक्रार केली. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी लावला आहे. महावितरणच्या अधिकार्यांकडून तक्रारीची योग्य दखल न घेतल्यामुळे मुलांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बडे कुटुंबाने केली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…