

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला या गावात वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी उपसा केलेल्या खड्ड्यात पडून चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील सिंदफणा नदीपात्रात रविवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
सिंदफणा नदीच्या पात्रामध्ये वाळू माफियांनी वाळू उपसा केल्यामुळे मोठे पाण्याचे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यात पडून बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले ९ ते १३ वयोगटातील आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो नागरिक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत असून जोपर्यंत जिल्हाधिकारी वाळू माफियांवर ठोस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत मृत्यूदेह ताब्यात दिले जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…