

मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने गेल्या काही दिवसात भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. अशातच पुन्हा भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल बोलताना शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे डोकं फिरलं आहे, अशी घणाघाती टीका केली.
संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, भाजपाचे डोके फिरले आहे. प्रसाद लाड हे काय इतिहासकार आहेत का ? रोज कोणीतरी उठून छत्रपती शिवरायांबद्दल बोलत आहे. मला वाटत आहे, यांच्या स्वप्नात औरंगजेब येतो आणि कानात मंत्र देतो. त्यानंतर हे बोलायला लागतात. शिवाजी महाराजांचा इतिहास अख्या जगाला माहिती आहे. यांची शिवरायांबद्दल बोलण्याची लायकी आहे का ? भाजपाने नवीन इतिहास संसोधन मंडळाची स्थापना केले आहे का? प्रसाद लाड नव्याने महाराष्ट्राचा इतिहास येणार आहेत का ? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी काल स्वराज्य भूमी कोकण महोत्सव या कार्यक्रमात बोलत असताना शिवरायांचा जन्म कोकणात झाला. त्यांचे बालपण रायगडावर गेले. शिवरायांनी स्वराज्याची शपथ रयागडवर घेतली, असे विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…