आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कोकण

Political : जे बिकाऊ होते तेच गेले; त्यांची पर्वा नको : खासदार विनायक राऊत यांचा घणाघात..!

कोकण
ह्याचा प्रसार करा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी   

ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिलो आहोत. त्यामुळे जे बिकाऊ होते ते शिवसेनेतून गेले. त्यांची फारशी पर्वा करण्याची आवश्यकता नाही असा घणाघात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

मागील १५ दिवसांत शिवसेनेच्या शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. आणि या धक्कादायक घडामोडीनंतर राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भाजपने एकत्र येऊन राज्यात नव सरकार स्थापन केलं. या सगळ्या राजकीय नाट्यावर  विनायक राऊतानी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, जे बिकाऊ होते ते गेले. ज्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिलो आहोत. अशी संकट खूप पेलली आहेत. नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर, वैभव नाईक यांचं आमने-सामने आव्हान अशी अनेक संकट पचवली आहेत. त्यावेळी पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाऊन आम्ही शिवसेना पुन्हा उभी केली आहे. त्यामुळे जे गेले त्यांची पर्वा  करायची आम्हाला गरज नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
कोकण
Back to top button
Contact Us
%d