

मुंबई : प्रतिनिधी
भारताने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी हे पंतप्रधान नसून ते प्रचारक आहे. विद्यार्थी बेपत्ता असताना ते स्वत: पाठ थोपटतात, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र राज्याला न शोभणारे व्यक्ती म्हणून राज्यपाल लाभले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून भाजपा त्याला पाठिंबा देते हे चुकीचे आहे. जर अशा व्यक्तीला भाजप राज्यपाल बनवणार असेल तर काँग्रेस पंतप्रधानांप्रमाणे राज्यपालांविरोधात गो बॅकचे नारे लावेल. मोदी हे प्रचारक आहेत. एअर इंडियाने तिकिटांचा दर वाढवल्याने २० हजार विद्यार्थी अडचणीत आले आहेत. अनेक जण बेपत्ता असताना मोदी स्वत:ची पाठ थोपटतात, असे ते म्हणाले.
भाजप पक्ष ओबीसींचा शत्रु असून स्वत:वरचे सगळे आरोप ते राज्य सरकारवर ढकलत आहेत. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. परंतु ओबीसी समाजाला भाजपला आरक्षण द्यायचे नाही.पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आपली बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…