महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ८०० कोटी रुपयांचा घोटाळा; नाना पटोले यांचा आरोप

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकाल्पामध्ये देवेंद्र  फडणवीस यांच्या सरकारने मोठा घोटाळा केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठी तत्कालीन सरकारने ४५ एकर जमिन खरेदी केली. यासाठी सरकारने रेल्वेला ८०० कोटी रुपये दिले. मात्र राज्य सरकारला अद्यापपर्यंत जमीन मिळालेली नाही. तसेच रेल्वेला दिलेले ८०० कोटी रुपये परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट आहे. या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी टिळक भवन येथे रविवारी पत्रकारांशी  संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या काळातच धारावीचा कायापालट व्हावा, तेथील लोकांना घरे मिळावी, स्वच्छ आणि सुंदर मुंबई व्हावी यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ती योजना कार्यान्वित झाली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात धारावी पुनर्वसन प्रकल्पाची योजना कार्यान्वित झाली. तत्कालीन सरकारने या योजनेच्या जमीन खरेदीसाठी रेल्वेला ८०० कोटी रुपये दिले. मात्र जमीन ही मिळाली नाही आणि रेल्वेला दिलेले पैसेही परत मिळालेले नाही. मग या योजनेचे पुढे काय झाले? योजना का फसली? असे प्रश्न उपस्थित करत नाना पटोले यांनी या घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी, ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी,अशी

मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
आपली बारामती न्यूज

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago