

मुंबई : प्रतिनिधी
देशात सध्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या
पार्श्वभूमीवर आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर भारताच्या राष्ट्रध्वजाचा फोटो लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे नेटकऱ्यांनी आरएसएसला ट्रोल केलं आहे. त्यावर आता संघाकडून प्रतिक्रिया आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले की, अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये. संघाने ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांना आधीच पाठिंबा दिला आहे. संघाने जुलैमध्ये लोकांना आणि स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा आणि सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. सरकार, खाजगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असं आवाहन केल्याचंही संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही संघाने वेबसाईट आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे चित्र न टाकल्यामुळे आरएसएसला ट्रोल करण्यात आले होते. यावर आंबेकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं.
‘मन की बात’मध्ये, पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल चित्र तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…