

मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. हृदयाशी संबंधित विकाराने त्रस्त असलेले चतुर्वेदी लखनऊमध्ये वास्तव्यास होते. या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिथिलेश चतुर्वेदी यांनी अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या.
कोई मिल गया, गदर एक प्रेम कथा, सत्या, बंटी और बबली, क्रिश, ताल, रेडी, अशोका आणि फिजा यासह अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबतचा ‘गुलाबो सिताबो’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…