

पुणे : प्रतिनिधी
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांच्या सचिवांना अधिकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सचिवच जर काम पाहणार असतील, तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा देऊन मुख्य सचिवांकडे कार्यभार सोपवावा असा टोला लगावला आहे.
आज पुण्यात विविध कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजितदादांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार लांबलेला असताना सचिवांना अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, जर अशा प्रकारे प्रशासन चालणार असेल तर अवघड परिस्थिती आहे.
लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना अधिकार द्यायचे अशा प्रकारची परिस्थिती कधीच आली नव्हती. हे जर खरोखर घडलेलं असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीच या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला उत्तर द्यायला हवं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…