

नाशिक : प्रतिनिधी
अगोदरचे सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकारदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. विरोधी पक्षातील नेते नोटिसांमुळे भेदरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी पाठीराखा राहिला नाही, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्षांवर चढवला.
मनमाड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, अगोदरचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उजव्या हाताने मारायचे आहे की डाव्या हाताने मारायचे . असा प्रश्न पडलाय, असे राजू शेट्टी म्हणाले.
यंदा राज्यात सगळीकडे जास्त पाऊस पडला. त्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना देखील राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही. विरोधी पक्षातील नेते गप्प आहेत. ते नोटिसांमुळे भेदरले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कोणीच पाठीराखा राहिला नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…