

कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीमधून बाहेर पडली आहे. संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार विरोधात जाहीर भूमिका घेत होते. त्यामुळे ते महविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे वेळोवेळी संकेत देत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर येथे आजच्या झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. राज्य कार्यकारिणीच्या होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याची राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आज निर्णय जाहीर केला. यापुढे रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो की यापुढे महाविकास आघाडी आणि आमचे संबंध संपले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती त्यांना सांगू. आम्हाला दिल्लीवाल्यांनी फसवले आणि मुंबईवाल्यांनीही फसवले आहे. आता शेतकऱ्यांना आम्हाला आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात राजू शेट्टी यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…