

मुंबई : प्रतिनिधी
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असे आश्वासन ना. अजित पवार यांनी या शिष्टमंडळाला दिले.
केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवरांचा समावेश होता.
आज सकाळी मेधा पाटकर, राजू शेट्टी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या भावना सरकारने लक्षात घेऊन राज्यात शेतकरी हिताचा कायदा लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील असे आश्वासन दिले. महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचेच प्रतिनिधीत्व करणारे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आम्ही कमी पडणार नाही असाही विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…