

मुंबई: प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून अक्कलदाढ उशिरा येते असे समजले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.शिवतीर्थावरचा भोंगा भाजपचा असून भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे. त्याचबरोबर त्याला टाळ्याही स्पॉन्सर असल्याचा घणाघात राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले. जर बोलायचे असेल तर ते त्यावर बोला. तुमच्या भोंग्याचे काय करायचे. त्यांच्या भोंग्यासाठी राज्य सरकार असमर्थ आहे. शरद पवार यांनी जातीवाद पसरवता असे तुम्ही म्हणता. पण त्याच शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होता हे विसरू नका, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, काल राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतून महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आज संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. शिवसेना आणि भाजप काय करायचं ते पाहून घेईल, दुसऱ्यांनी त्यात पडू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…