

बारामती : प्रतिनिधी
राहुल गांधी विनायक सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी मोडीत निघेल असा इशारा कॉँग्रेसला दिला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. जोपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पक्षांच्या प्रमुखांचा आशिर्वाद आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
बारामतीत आज अजित पवार यांचा जनता दरबार पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसतो. राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार, कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे जोपर्यंत महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला किंचितही अडचण नाही, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
याचवेळी त्यांनी सावरकर यांच्यावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. देशासह राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. असे असताना काहीतरी विषय उकरून काढून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आज राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. असे असताना त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…