

बारामती : प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरचे सगळे निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे सगळ्यांना मास्क वापरणे बंधनकारक नाही. इच्छा असेल तरच मास्क वापरावे अशा सूचना दिल्या आहेत. तरीदेखील तुम्ही स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालव्याच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. आजपर्यंत अनेकांनी पाण्याबाबत निवेदने दिली आहेत. निवेदनातून आपण ज्या काही मागण्या करता त्या मागण्या पूर्ण करायचे आमच्या मनात नसते का? पण अगोदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी आणि नंतर मग शेतीसह इतर कामांसाठी ते पाणी वापरावे, अशी जयंत पाटील आणि आम्हा सगळ्यांची भावना असते.
सगळ्यांनी पाण्याची उपलब्धता तपासून उसाची लागवड करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मला कालच सोमेश्वरच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम घ्यायचा होता. परंतु काल दिवसभर इतर कार्यक्रमामुळे शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने कार्यक्रमासाठी आज सकाळीची वेळ द्यावी लागली. कुणाला तरी त्रास देण्यासाठी अशी सकाळची वेळ ठेवलीय असा चुकीचा अर्थ घेऊ नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…