

अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी २८ जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १४ वर्षानंतर या खटल्याचा अंतिम निकाल देण्यात आला.
विशेष न्यायमूर्ती ए .आर. पटेल यांनी आमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी निकाल देताना बॉंबस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदाबादमध्ये २८ जुलै २००८ रोजी तब्बल ७० मिनिटे पाठोपाठ २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ५६ नागरिकांनी आपला जीव गमावला होता. तर २०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. गुजरातमधील गोध्रा हत्याकांड दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…