

अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात भारताचा ६ गडी राखून विजय झाला आहे. हा भारताचा १००० वा एकदिवसीय सामना होता, त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांपैकी सर्वाधिक धावा जेसन होल्डर याने ५७ धावा केल्या. कर्णधार पोलार्डला खातेदेखील उघडता आले नाही. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ ओव्हरमध्ये गारद झाला.
भारताला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान होते. या सामन्यात युझवेंद्र चहलने ९.५ ओव्हर टाकल्या. त्यामध्ये त्याने एकूण ४९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या विकेटबरोबर त्याने एक दिवसीय क्रिकेटमधील शतक पूर्ण केले आहे. वॉशिंग्टन सुंदर ३ विकेट , प्रसिध कृष्णा २ विकेट आणि मोहम्मद सिराज ने १ विकेट घेतली.
त्यानंतर १७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी सलामीला मैदानात उतरली. यामध्ये रोहित शर्माने ६० धावा, ईशान किशनने २८ धावा, विराट कोहलीने ८ धावा, रिषभ पंतने ११ धावा केल्या. त्याचबरोबर सुर्यकुमार यादव नाबाद ३४ धावा आणि दिपक हुडा नाबाद २६ धावा केल्या. त्यांच्या या नाबाद खेळीने भारताचा विजय झाला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…
View Comments
kqag78
CnQuEGNPefWy
dqCtBGLsOIJSA
BwLmhAOI
YzCRtQwZmkysMFNT