

अहमदाबाद : वृत्तसंस्था
उद्यापासून भारत आणि वेस्ट इंडिजची एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. ही वनडे मालिका अहमदाबादमधील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर पहिला सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी सलामीला मैदानावर उतरणार आहे.
सामन्याआधी संघात कोरोनाचा शिरकाव झाला. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली. उद्या होणार्या पहिल्या वनडे आणि त्यांच्यानंतर खेळल्या जाणाऱ्या वनडे सामनाही या खेळाडूंना खेळता येणार नाही. शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी सलामीला मैदानावर उतरणार होती मात्र शिखर धवनला कोरोना झाला आणि राहुलही पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे सलामीच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. मयंक अग्रवालची संघात निवड करण्यात आली, त्याचंबरोबरीने ईशान किशनची निवड करण्यात आली आहे.
मयंकचा अनुभव लक्षात घेता रोहित शर्मा सलामीची संधी त्याला देईल, अशी चर्चा होती मात्र मयंकला संधी मिळणार नाही. त्याच्या जागी ईशान रोहितच्या बरोबर मैदानात येणार आहे. हीच जोडी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या संघाद्वारे सलामीला मैदानावर येत होती.रोहितसोबत ईशाननेच सलामीला मैदानावर यावं असे मत माजी क्रिकेटर सबा करीम म्हणाले होते. काही खेळाडूंना संसर्ग झाल्याने तुमच्याकडे पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तुमचा संघ खचु शकतो असे वक्त्व्य त्यांनी केले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…