आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

POLITICAL BREAKING : कोणीही उठून काहीही बोलतंय, भाजपचं डोकं फिरलं आहे : संजय राऊत यांची घणाघाती टीका

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने गेल्या काही दिवसात भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. अशातच पुन्हा भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल बोलताना शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे डोकं फिरलं आहे, अशी घणाघाती टीका केली.

संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, भाजपाचे डोके फिरले आहे. प्रसाद लाड हे काय इतिहासकार आहेत का ? रोज कोणीतरी उठून छत्रपती शिवरायांबद्दल बोलत आहे. मला वाटत आहे, यांच्या स्वप्नात औरंगजेब येतो आणि कानात मंत्र देतो. त्यानंतर हे बोलायला लागतात. शिवाजी महाराजांचा इतिहास अख्या जगाला माहिती आहे. यांची शिवरायांबद्दल बोलण्याची लायकी आहे का ? भाजपाने नवीन इतिहास संसोधन मंडळाची स्थापना केले आहे का? प्रसाद लाड नव्याने महाराष्ट्राचा इतिहास येणार आहेत का ? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी काल स्वराज्य भूमी कोकण महोत्सव या कार्यक्रमात बोलत असताना शिवरायांचा जन्म कोकणात झाला. त्यांचे बालपण रायगडावर गेले. शिवरायांनी स्वराज्याची शपथ रयागडवर घेतली, असे विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d