

कराड : प्रतिनिधी
कराड तालुक्यातील तासवडे गावात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सीमा सदाशिव शिंदे (वय ४८), हिंदुराव मारुती शिंदे ( वय ५८) , आणि शुभम सदाशिव शिंदे ( वय २३) अशी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी हिंदुराव शिंदे, त्यांची भावजय सीमा शिंदे आणि पुतण्या शुभम शिंदे हे विहिरीजवळ असणाऱ्या शेतामध्ये फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. त्यामध्ये त्या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सुमारे तासभरानंतर तिघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. ऐन गणेशोत्सवाच्या काळात या घटनेमुळे तासवडे गावावर शोककळा पसरली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…