

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिलो आहोत. त्यामुळे जे बिकाऊ होते ते शिवसेनेतून गेले. त्यांची फारशी पर्वा करण्याची आवश्यकता नाही असा घणाघात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
मागील १५ दिवसांत शिवसेनेच्या शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. आणि या धक्कादायक घडामोडीनंतर राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भाजपने एकत्र येऊन राज्यात नव सरकार स्थापन केलं. या सगळ्या राजकीय नाट्यावर विनायक राऊतानी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, जे बिकाऊ होते ते गेले. ज्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिलो आहोत. अशी संकट खूप पेलली आहेत. नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर, वैभव नाईक यांचं आमने-सामने आव्हान अशी अनेक संकट पचवली आहेत. त्यावेळी पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाऊन आम्ही शिवसेना पुन्हा उभी केली आहे. त्यामुळे जे गेले त्यांची पर्वा करायची आम्हाला गरज नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…