

मुंबई : प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. आज निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषद आणि चार नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद व चार नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम आज जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून २० जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या सूचनेनुसार २२ ते २८ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळांवर उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. २९ जुलै रोजी वैध उमेदवारी अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली जाणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर लगेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ ऑगस्ट रोजी मतदान होवून दुसऱ्या दिवशी अर्थात १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…