

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानाच्या बाहेर ध्वजारोहण सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीवरून सतत टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री आजारी असताना नामर्दपणाची वक्तव्य करणाऱ्यांना चपराक बसली, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असताना त्यांच्यावर अत्यंत नामर्दपणाची टीका करत होते. आता त्यांना मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात येणार आहेत. मी हे वारंवार सांगत होतो. ते शिवाजी पार्कवर आले होते.
ज्यांनी कोणी मुख्यमंत्र्याविषयी नामर्दपणाची वक्तव्य केलेले आहेत त्यांना चपराक बसली. त्यांच्या अंगात किती घाण आणि कचरा आहे हे यावरून स्पष्ट होते अशा शब्दात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी गंभीर आजारातून जात होते. त्यावेळी आम्ही त्यांची काळजी घेतली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मोठ्या मनाचे राजकारण संपत चालले आहे, अशी खंत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…