

मुंबई : प्रतिनिधी
भाजप मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आणि शिवसेनेला मात देण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केली आहे. मुंबई काबिज करू पाहणाऱ्या भाजपचे केवळ दोन ते तीन नगरसेवक सक्रिय असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणी किती आक्रमक व्हावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसार भाजपचे बरेच नगरसेवक केवळ आरोप केल्यानंतर पेपरचे गठ्ठे पाठवतात. त्याच्यापुढे ते कोणतीही खात्री करत नाहीत. येत्या निवडणुकीत आम्ही मुंबई काबीज करणार असे ते म्हणत आहेत. कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी ते असे बोलत असतील. मात्र त्यांच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. केवळ दोन ते तीन नगरसेवक सोडून मला कोणी सक्रिय वाटत नाही.
भाजपला चांगल्या कामात रस नाही. केवळ शिवसेनेला बदनाम करणे हेच त्यांचे टार्गेट आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आमचा मुंबईकरांवर विश्वास असून या वर्षीसुद्धा मुंबईत शिवसेनेची सत्ता असेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…