

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील सातारा मुंबई महामार्गावरील असलेल्या नवले ब्रिजवर काल रात्री भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, भरधाव टँकरने तब्बल ४८ गाड्यांना धडक दिली. रात्री साडे आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये सुमारे ५० ते ६० जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल रात्री भरधाव टँकरने ४०० ते ५०० मीटर अंतरावरील तब्बल ४८ गाड्यांना धडक दिली. या गाड्यांमध्ये प्रामुख्याने कारचा समावेश आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. अपघात प्रचंड मोठा असल्याने परिसरात हाहाकार उडाला होता. ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच अग्निशमन दल, रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्य करण्यासाठी मदत केली. अपघात मोठा असल्याने बऱ्याच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…