

मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आज राज्यपाल सोलापुरात असताना शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने केली. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना, विचार करून बोलायचं असतं, असा सल्ला राज्यपालांना दिला आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला आहे. आजित पवार म्हणाले, राज्यपाल हे मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना आपल्यावर सगळ्यांचे लक्ष असते, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे बोलताना आपण विचार करून बोललं पाहिजे.
कोणत्याच राज्य सरकारला एवढा मोठा वर्ग असणारा ओबीसी समाज हा निवडणुकीपासून वंचित रहावा, असे वाटणार नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे राज्यातील सगळ्या लोकप्रतनिधींचे एकमत आहे. त्यामुळे निवडणुकांचा मुद्दा पुढे येत नाही. मात्र शेवटी तो आधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…