

बारामती : प्रतिनिधी
राज्यपालांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्यावरून अजितदादांनी थेट पंतप्रधानांसमोर कान टोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांनी रोखठोक शब्दात राज्यपालांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची या महाराष्ट्राची संस्कृती असून महामहीम राज्यपालांनी अनावश्यक वक्तव्ये करून वाद निर्माण करून नयेत असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यावर आता सर्वच पक्षातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून राज्यपालांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यापूर्वी राज्यपालांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी थेट पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीरपणे कान टोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर शरसंधान साधले आहे. ट्विटरवर अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।’
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…