

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ईडीच्या अटकेत आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यापासून दररोज त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी संधी मिळालेली नाही.त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. ते केवळ जेलमध्ये असल्याने त्यांचे पद काढून घेणे योग्य नाही. अनिल देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. आतापर्यंत त्यांच्या घरावर ९५ वेळा छापे टाकण्यात आले आहेत. मात्र हे सगळे जाणीवपूर्वक चाललेले आहे, ही आम्हा सर्वांची धारणा झालेली आहे.
नवाब मलिक यांना स्पष्टीकरण देण्यासाठी संधी मिळालेली नाही. त्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असते. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळायला हवी होती. मात्र असे झालेले नाही. त्यामुळेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे योग्य नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…