चंद्रकांत दादा सध्या झोपेतही बोलतात, त्यांचं मनावर घेऊ नका : जयंत पाटील यांचा टोला

ह्याचा प्रसार करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

चंद्रकांत पाटील सध्या झोपेतही बोलतात असे कानावर पडले आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका. चंद्रकांत पाटील सध्या राज्य सरकारवर टीका करत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्याला जास्त महत्व देणे गरजेचे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

इतर सर्व पक्षात लोक धुतल्या तांदळासारखे आहेत.  भारताची लोकसंख्या १२० कोटी असूनही केंद्रीय तपास यंत्रणेला महाराष्ट्रातील लोक दिसतात. त्यातही  महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचेच लोक दिसतात, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, भाजपात गेल्याने शांत झोप लागते असे भाजपचे खासदार सांगत आहेत.  भाजपात आश्रय मिळतो. मात्र भाजपाच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांची १४ -१५ वर्षापूर्वींची कागदपत्रे बाहेर काढायची. त्यांच्यामागे चौकशी लावून द्यायची. त्यांच्यावर छापेमारी करायची आणि त्यांची बदनामी करायची, असे काम केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे.  केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

समीर वानखेडे यांच्या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अधिकाराच्या बाबतीत भाजपने ते गांभीर्याने घेणे गरजेचे नाही. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर समीर वानखेडे उत्तर देतील. राज्यातील माणसाला देखील समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल शंका निर्माण होईल. नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात दिलेल्या माहितीमुळे सर्व काही उघड झालेले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे आणि नवाब मलिक आपली भूमिका मांडतील. भाजपने मध्ये पडून त्यांचा कार्यक्रम करण्याची गरज नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago