

पुणे : प्रतिनिधी
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद शरद पवार यांनी कुणाच्याही कोंबड्याने दिवस उगवला तरी माझी काही हरकत नाही, असे म्हणत मिश्किल टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शरद पवार म्हणाले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत माझी मागणी नव्हती. केवळ निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, असे मी भाजपला सुचवलं होतं. यासंदर्भात ते सकारात्मक निर्णय घेतील, याबद्दल मला खात्री होती.
एकदा निर्णय झाल्यानंतर मी त्या निर्णयाच्या संदर्भात जास्त खोलामध्ये जात नाही. त्यामुळे या निर्णयासंदर्भात जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असे सांगतानाच त्यांनी अधिकचे बोलणे टाळले. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. याचे सगळे श्रेय राज ठाकरे यांना दिले जात आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता शरद पवार यांनी कुणाच्याही कोंबड्याने दिवस उगवला तरी माझी काही हरकत नाही, असा मिश्किल टोला लगावला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…