

मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी माघारी घेण्यात येत असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीची चर्चा होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काल याबाबत प्रतिक्रिया देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचं आवाहन केलं होतं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला पत्र देत लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.
काल रात्रीपासून भाजप नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर सकाळी भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही आपण पक्षाच्या आदेशानुसार माघार घेत असल्याचे सांगितले आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा होती असं सांगत ऋतुजा लटके यांनी शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होत असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…