

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता कॉँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते आता मुंबईत दाखल झाले असून राज्यातील आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. कोणताही दगा होवू नये यासाठी या आमदारांचे मुंबईत पोहोचेपर्यंत लोकेशन ट्रेस केले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज समर्थक आमदारांसह बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. शिंदे हे आमदारांसह सुरतमध्ये थांबले असून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता कॉँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.
राज्यातील कॉँग्रेस आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. सध्याच्या बंडाच्या खेळीत दगाफटका होऊ नये यासाठी कॉँग्रेसकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे या सर्व आमदारांचे मुंबईत पोहोचेपर्यंत लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. दरम्यान, सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले जाणार असून या दरम्यान विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावर चिंतनही केले जाणार आहे. दुसरीकडे भाजपनेही आमदारांना अन्य राज्यात हलवण्याची तयारी चालवली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…