

मुंबई : प्रतिनिधी
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तीन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केल्याचं समजते.
काल विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर रात्रीच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह सुरतला गेले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेने आपले सर्व आमदार वर्षावर बोलावून घेतले आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या तीन मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला असून मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना द्यावे अशीही मागणी केली असल्याचे समजते. शिवसेनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा संपवावा अशीही मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांना बोलावून घेत बैठका सुरू केल्या आहेत. याच दरम्यान, शिवसेनेकडून दोन नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…