

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘आपल्या बुडाखाली काय जळते, हे भाजपने पाहावे’ अशी खरमरीत टीका भाजपचे केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना जेवढा निधी दिला नव्हता. त्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. महाविकास आघाडीचे आमदार फुटणे हे अशक्य आहे. जरी महाविकास आघाडीतील एखादा आमदार फुटलाच. तो आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. त्यामुळे भाजपाने आपल्या बुडाखाली काय जळतयं, ते पहावे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपला त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहणार नसल्याची चिंता आहे. त्यांचे आमदार त्यांच्या सोबत राहण्याची कसलीच शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. २५ आमदार बाहेर पडणार आहेत. आम्ही वेडे आहोत का? राजीनामा देऊन बाहेर पडणे सोपे नाही. महाविकास आघाडीमधील बाहेर पडणाऱ्या आमदारांना लोकं सळो की पळो करतील. या प्रकारची कुठलीच घटना घडणार नाही. या सरकारवर भाजप आमदार देखील खूश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…