

बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून न्याय मिळत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रोहिदास जनार्दन माने या शेतकऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादात न्याय मिळत नाही, अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही अशी या शेतकऱ्याची तक्रार आहे. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
संबंधित शेतकऱ्याला बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. दुसरीकडे या शेतकऱ्याने यापूर्वी उपोषण करत प्रशासनाकडे आपली मागणी मांडली होती. तसेच इंदापूर तहसीलदारांकडे आत्मदहन करणार असल्याबाबत पत्रही दिले होते. मात्र प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. त्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचेही समोर आले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…