१९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होते; खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले : कंगना राणावतचे वादग्रस्त विधान

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेली पद्मश्री प्राप्त अभिनेत्री कंगना राणावत हिने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होते, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले आहे, असे वादग्रस्त विधान कंगना राणावतने केले आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर सोशल मीडियातून टीका होवू लागली आहे.

केंद्र शासनाकडून नुकताच कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असते.  अशातच कंगना राणावतने १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होते, खरे स्वातंत्र्य हे २०१४ मिळालेले आहे. झाशीची राणी,  नेताजी सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर यांना एक  हिंदुस्तानी दुसऱ्या हिंदुस्तानीवर वार करणार नाही हे माहिती होते. स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली आहे हे खरे असले तरी हे स्वातंत्र्य भीक होते. खरे स्वातंत्र्य हे २०१४ ला मिळाल्याचे कंगना राणावतने म्हणले आहे.

कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर टिका होवू लागली आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी  मानसिकदृष्ट्या स्थिर नसलेली विक्षिप्त व्यक्ती ही स्वातंत्र्याला भीक म्हणू शकते. स्वातंत्र्यासाठी  लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी अशा  लोकांना पद्मश्री देणाऱ्या नरेंद्र मोदींनी याचे उत्तर द्यायला हवे.  आपण स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरा करत आहोत की तुमच्या भक्ताच्या म्हणणयानुसार मिळालेल्या स्वातंत्र्याचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago