‘या’ अटीवर कंगना राणावत ‘पद्मश्री’ पुरस्कार परत द्यायला तयार..?

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात ‘ १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी होवू लागली आहे. टीकेला प्रत्युत्तर देताना कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून मी पद्मश्री पुरस्कार परत द्यायला तयार आहे, मात्र मी शहिदांचा अपमान केला हे सिद्ध करून दाखवावं, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगना राणावत हिला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक होते. खऱ्या अर्थाने देशाला २०१४ साली स्वातंत्र्य मिळालं आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. वादग्रस्त विधानानंतर कंगनावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच केंद्र शासनाने दिलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

कंगणाने आज इंस्टाग्राम स्टोरीमधून एक छायाचित्र शेअर केले आहे. राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांच्याबद्दल मी त्या मुलाखतीत स्पष्ट बोलले होते. १८५७ सालच्या उठावासाठी संघटित लढाई लढली गेली होती. त्याच प्रकारे १९४७ मध्ये कोणती लढाई लढली गेली होती. याबद्दल मला कोणी सांगेल का? जर मला कोणी सांगितले तर मी माफी मागेल. तसेच मी माझा पद्मश्री पुरस्कार पुन्हा परत करेल, कृपया मला  मदत करा असेही तिने या स्टोरीत नमूद केले आहे.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Share
Published by
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago