

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.
राज्यभरातील शिवप्रेमींनी राज्यातील मंत्र्यांच्या निवासस्थानाला प्रसिद्ध गड, किल्ल्यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. त्यांच्या प्रस्तावाला अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे आता राज्यातील दुकानांच्या पाट्या बरोबरच मंत्र्यांच्या निवासस्थानांची सुद्धा नावे बदलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाचे नाव बदलणार का, असा सवाल सगळयांना पडला होता. मात्र, मलबार हिल परिसरात नावे बदललेल्या बंगल्याचा समावेश होत नाही. कदाचित या परिसरातील बंगल्याचा विचार केला जाऊ शकतो.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…