

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या राज्यात वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून १५ फेब्रुवारीनंतर परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांची बैठक पार पडली. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुरक्षिततेला महत्व देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत सुरू असलेल्या परीक्षा, त्याबाबतचे नियोजन याचाही आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…