

महाबळेश्वर : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत केवळ एका मताने झालेला पराभव आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातून काल साताऱ्यात गोंधळही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कालच्या या चर्चेनंतर पवार यांनी शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते, या एकाच वाक्यात त्यांच्या पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.
महाबळेश्वर येथे शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे यांचा पराभव का झाला याच्या खोलात मी जाणार नाही. मात्र शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते.
शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, जर कृषी कायदे मागे घेतल्याने नुकसान होत असेल तर केंद्राने ते मागे का घेतले ? कृषी हा विषय राज्याचा आहे. केंद्र सरकारने त्यावेळी सरकारसोबत चर्चा केली नाही. राज्य सरकारांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांबाबत धोरणे ठरवताना सदनामध्ये चर्चा होत नाही.
आगामी पाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद सरकारने हे कायदे मागे घेतले असल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी यावेळी केला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…