Big News : राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐतिहासिक वाढ; संप मागे घेण्याचे आवाहन

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

दोन आठवड्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विविध पर्याय देत संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने तोडगा निघत नव्हता. मात्र आज राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह संयुक्त पत्रकार घेत परिषदेत पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. 

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावर अद्याप निर्णय घेता येणार नाही. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. याबाबत न्यायालयाने समिती नेमली आहे. समिती अभ्यास करून निर्णय देईल. कर्मचाऱ्यांचे जे म्हणणे असेल ते समितीसमोर मांडावे, असा न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगत अनिल परब यांनी एसटी विलनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने समिती जो निर्णय घेईल, तो राज्य सरकारला मान्य करेल असे स्पष्ट केले. संपामुळे राज्यातील ग्रामीण जनतेचे मोठे हाल होत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ केली आहे. पहिल्या टप्प्यातील एसटी कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये पगार वाढ करत जवळपास त्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ केली. ज्या कर्मचाऱ्यांनी एक ते दहा वर्ष सेवा बजावली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. 

दहा ते वीस वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चार हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक आठवड्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये होतील. त्यासोबतच निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. 


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago