

जालना : प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मंगळवारी दि. २० फेब्रूवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात काय निर्णय होतो हे पाहून आपण आरक्षणाबद्दलच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केलं आहे.
राज्य सरकारने २० फेब्रूवारी रोजी विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यात सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अशी मनोज जरांगे पाटील यांची आग्रही मागणी आहे. त्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भुमिका स्पष्ट केली.
उद्या शिवजयंती आहे.. त्यानंतर राज्य सरकारचं अधिवेशन होणार आहे. सरकारने ज्यांना दाखले दिलेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करुन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहून आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…