

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने कहर घातला होता. तिसऱ्या लाटेबरोबरच ओमिक्रॉन विषाणूचे संकट राज्यावर होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन प्रत्येक राज्यातील तिसरी लाट आता ओसरू लागली आहे. त्यामुळे महाविद्यालय ऑफलाइन सुरू झालेली आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी कोरोना परिस्थिती अनुकूल आहे, त्या ठिकाणची महाविद्यालय पूर्ण क्षमतेने खुली करणार असल्याचे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. जर यापुढे पूर्ण क्षमतेने किंवा ५० टक्के अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरु यांनी तशी सविस्तर चर्चा सुरु करावी. पूर्ण क्षमतेने महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आमच्याकडे पाठवावा.
प्रस्तावावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल. ज्या भागातील कोरोनाची परिस्थिती ठीक वाटली तर तेथील महाविद्यालयांना पूर्णवेळ सुरू करण्याबाबत परवानगी दिली जाईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…